पती-पत्नीचे नाते नाजूक धाग्याने बांधलेले नाते असते. हे नातं अधिक काळ टिकवायचं असेल तर काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते जर एखाद्या विवाहित जोडप्याने त्यांच्या नात्यात मर्यादा ओलांडल्या तर त्यांचे नाते कमकुवत होऊ लागते. जर या जोडप्याने या गोष्टींकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्यांचे नाते कायमचे तुटू शकते.
प्रामाणिकपणा
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या ‘नीती शास्त्रा’मध्ये म्हटलंय की, पती-पत्नीचे नाते तेव्हाच घट्ट राहते जेव्हा त्यात प्रामाणिकपणा असतो. एकदा का जोडीदाराने प्रामाणिकपणाची मर्यादा ओलांडली आणि नात्यात शंका निर्माण होतात. त्या एकदा निर्माण झाल्या की मग नात्यात दुरावा निर्माण होतो. नात्याचा पाया कमकुवत होत असतो त्या कारणामुळे नातं तुटत असतं.
खोटे बोलणं
कोणत्याही परिस्थितीत व्यक्तीने आपल्या जोडीदाराशी खोटे बोलू नये. खोटं बोलण्याच्या पायावर नाती उभारली तर नाती फार लवकर तुटत असतात. त्यामुळे तुम्हालाही तुमचे नाते घट्ट करायचे असेल तर चुकूनही खोट्याची मर्यादा ओलांडू नका.
समर्पण
विवाहित जोडप्यामध्ये नेहमी समर्पणाची भावना असली पाहिजे. नात्यातील समर्पणाची भावना कमी व्हायला लागली तर नातं कमकुवत होऊ लागतं. त्यामुळे इच्छा नसतानाही दोघांमध्ये दुरावा निर्माण होऊ लागतो.
आदर
आचार्य चाणक्यांनी आपल्या 'नीती शास्त्रा'मध्ये म्हटलंय की, आहे की जर पती-पत्नीमध्ये एकमेकांबद्दल आदर नसेल तर त्यांचे नाते फार काळ टिकत नाही. नाते घट्ट करण्यासाठी दोघांनीही कधीही आदराची मर्यादा ओलांडू नये.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.