Chanakya Niti
Chanakya NitiSaam Tv

Chanakya Niti : चाणक्यांनी दिली धोक्याची घंटा ! प्रत्येकांने या 4 गोष्टी केल्यानंतर लगेच करायला हवी आंघोळ, अन्यथा...

Life lesson : आपण दिवसभरात अशा अनेक गोष्टींना स्पर्श करत असतो. घरी आल्यानंतर अनेकदा आपल्या लक्षात देखील ते राहात नाही.
Published on

Bathing Importance In Chanakya Niti : आपण दिवसभरात अशा अनेक गोष्टींना स्पर्श करत असतो. घरी आल्यानंतर अनेकदा आपल्या लक्षात देखील ते राहात नाही. त्यामुळे काही नकारात्मक ऊर्जा आपल्या मागे सतत फिरत असते व त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो.

जीवनातील यशासाठी, कुशल अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य (Chanakya) यांनी नीति शास्त्रामध्ये म्हणजेच चाणक्य धोरणामध्ये अनेक धोरणे स्पष्ट केली आहेत. चाणक्याची धोरणे वास्तविक जीवनात खूप फायदेशीर (Benefits) मानली जातात. या धोरणांचा मार्ग अवलंबून यश मिळू शकते. चाणक्यानी सांगितले की, आपण या 4 गोष्टी केल्यानंतर लगेच आंघोळ करायला हवी जाणून घेऊया त्याबद्दल

Chanakya Niti
Chanakya Niti - Life Lesson: जीभेवर साखर ठेवल्यास, नोकरी-धंद्यात मिळेल पैसाच पैसा ! फक्त या 6 गोष्टी लक्षात ठेवा...

1. आचार्य चाणक्य म्हणतात की कोणत्याही व्यक्तीच्या अंतिम संस्काराला गेल्यानंतर व्यक्तीने स्नान केलेच पाहिजे. कारण स्मशानभूमीत नेहमी नकारात्मक उर्जेचा प्रवाह असतो. त्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या मनोबलावर होतो. यासोबतच स्मशानभूमीत अनेक मृतदेहांचे दहन केले जाते किंवा काही काळाच्या अंतराने मृतांचे अंतिम संस्कार केले जातात. या दरम्यान, तेथे अनेक प्रकारचे जंतू देखील असतात जे तुमच्या शरीरावर चिकटून राहू शकतात. अंत्यसंस्कारानंतर लगेच आंघोळ केल्याने व्यक्ती नकारात्मकता आणि जंतू या दोन्हीपासून वाचते.

2. चाणक्य सांगतात की, तेल मालिश केल्यानंतरही लगेच आंघोळ करावी. कारण तेल मसाज करताना शरीराच्या छिद्रांमधून घाण बाहेर पडते. अशा स्थितीत लगेच आंघोळ (Bath) केल्याने शरीरातील सर्व घाण निघून जाते.

Chanakya Niti
Chanakya Niti On Relationship : नवरा-बायकोच्या या 6 चुकांमुळे वैवाहिक आयुष्य होते उद्धवस्त, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला

3. प्रेमप्रकरणादरम्यान केलेल्या अर्थात लैंगिक संबंध ठेवल्यानंतर स्त्री आणि पुरुष दोघांनी आंघोळ करावी. अशा स्थितीत लगेच आंघोळ केल्याने शरीरातील सर्व घाण निघून जाते.

Chanakya Niti
Prajakta Gaikwad Photos : पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा! प्राजक्ताच खुललं सौंदर्य...

4. चाणक्य सांगतात की, केस कापल्यानंतरही माणसाने आंघोळ केली पाहिजे. केस कापल्यानंतर त्याचे काही केस शरीराच्या भागांवर चिकटतात आणि सहज बाहेर पडत नाहीत. म्हणूनच केस कापल्यानंतर लगेच आंघोळ करावी.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com