तब्येतीच्या तक्रारीसाठी रवी उपासना फलदायी ठरते.
सूर्यनमस्कार आणि रवी अष्टक रोज म्हटल्याने आरोग्याच्या तक्रारी कमी होतात.
काही वेळेला खूप ताप चढतो. डॉक्टरी ईलाज करून बरा होत नाही. अशावेळी आजारी माणसाच्या हाती चिमूटभर मूग दह्यात टाकून ते व दही शिवपिंडीवर किंवा मोठे खोड असलेल्या वड किंवा पिंपळाच्या मुळाशी वहावे.
आपल्या नक्षत्र देवतेचा रोज एक माळ जप केल्यामुळे आरोग्याची साथ चांगली मिळते.
हृदय रोगासाठी जशी सूर्य उपासना फलदायी आहे तसेच ललिता सहस्त्रनामाच्या पाठाचाही फार चांगला उपयोग होतो.
देवी भक्तांनी हे स्तोत्र रोज वाचावे. त्यायोगे देवीची कृपा होते आणि अपूर्व मनशांती, आत्मज्ञान प्राप्त होऊन मोक्षाकडे वाटचाल होते.
पाठीच्या मणक्याचे आजार असणाऱ्यांनी उदबत्तीची किंचित विभूती खोबरेल तेलातून पाठीच्या कणाला हलकेच वरून खाली असे दररोज थोडी तीन महिने हलके मालिश करावे.
देवी कवच, दत्त कवच, हनुमान कवच यापैकी एक सकाळ संध्याकाळ प्रत्येकी एक वेळ म्हणावे आणि ||ॐ धर्नुदैयै नम:||हा जप रोज एक माळ करावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.