महाराष्ट्राच्या राजकारणातील आजचा दिवस ऐतिहासिक आहे. ठाकरे बंधू जवळपास २० वर्षांनी एकत्र आले आहेत.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे याआधी २००५ मध्ये एका मंचावर दिसले होते. त्यानंतर आज एकत्र आले आहेत.
मराठी भाषा विजय मेळाव्यासाठी ते वरळी डोम येथे एकत्र आले आहेत. या दोघांनी मराठीसाठी एकत्र यायचे ठरवले आहे.
आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही. परंतु महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती नको, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मंचावर एकत्र एन्ट्री घेतली आहे. त्यांनी एकत्र येत सर्वात आधी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवले.
यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. त्यानंतर दोघांनीही भाषण केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.