Chanakya Niti : 'या' लोकांबरोबर मैत्री म्हणजे करिअर येईल धोक्यात अन् भासेल पैशांची चणचण
आचार्य चाणक्य
आचार्य चाणक्य यांच्या मते, वाईट संगतीचा आपल्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम पडतो.
चुकीच्या लोकांबरोबर मैत्री टाळा
चुकीच्या लोकांबरोबर मैत्री आयुष्यासाठी भारी पडू शकते. म्हणून आचार्य चाणक्य यांच्या मते, मैत्री करताना पूर्ण विचार करावा.
आयुष्यात पुढे जाऊ न देणारे लोक
चाणक्य नितीनुसार, जे मित्र तुम्हाला आयुष्यात पुढे जाऊ देत नाहीत. तुम्हाला कमी लेखतात. अशा लोकांशी मुळीच मैत्री करू नये.
चारचौघात कमी लेखणारे
अशी लोक कधीच तुम्हाला चांगला सल्ला देणार नाही. उलट तुम्हाला चारचौघात कमी लेखून स्वतःची स्तुती करतील.
स्वातंत्र्यावर येईल गदा
अशी लोक तुम्हाला त्याच्या बोलण्यानुसार वागायला लावतील.
प्रत्येक गोष्टीत कमतरता शोधणे
जो माणूस तुमच्या प्रत्येक गोष्टीत कमतरता शोधत असेल. तो, कायम तुम्हाला मागे खेचत राहिली.
फक्त स्वतःचा विचार
जो माणूस कायम स्वतःच्या आयुष्याचे रडगाणे गात असेल, तो कधीच चांगला मित्र होऊ शकत नाही.
स्वार्थी लोक
अशा स्वार्थी लोकांसोबत राहिल्यास कायम तुमच्या करिअर आणि पैशांचे नुकसान होईल.
खरा मित्र
आचार्य चाणक्य यांच्या मते, खरा मित्र हा सुख दुःखात साथ देणारा असावा. कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या सोबत राहाणारा हवा. आपल्याला प्रोत्साहन देण्यास तत्पर हवा.
टीप
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.