
वैदिक ज्योतिषानुसार ग्रह ठराविक कालांतराने आपल्या उच्च राशीत किंवा मूलत्रिकोण राशीत भ्रमण करत असतो. या ग्रह गतीचा थेट परिणाम मानवी जीवनावर तसंच पृथ्वीवरही दिसून येतो. वैभव आणि ऐश्वर्याचा दाता मानला जाणारा शुक्र ग्रह दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यात आपल्या स्वराशी म्हणजे तुला राशीत प्रवेश करणार आहे.
ज्योतिष्य शास्त्रानुसार, या गोचराचा प्रभाव सर्व राशींवर पडणार असला तरी तीन राशींसाठी हा काळ विशेषतः सुवर्णयोग घेऊन येणारा ठरू शकणार आहे. या राशींच्या जातकांना धन, कीर्ती आणि अचानक लाभ होण्याची संधी मिळू शकणार आहे. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे ते पाहूयात.
मकर राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र ग्रहाचा हा गोचर अत्यंत लाभदायी ठरू शकणार आहे. कारण हा गोचर तुमच्या कुंडलीतील दशम भावात होणार आहे. या काळात तुमच्या कामधंद्यात मोठी प्रगती होणार आहे. निर्णयक्षमता वाढण्याची शक्यता आहे. वरिष्ठ आणि कनिष्ठांचं चांगलं तुम्हाला लाभणार आहे.
धनु राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचं हा गोचर फारच हितावह ठरणार आहे. शुक्र ग्रह तुमच्या अकराव्या भावातून भ्रमण करणार आहे. या काळात समाजात तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. लोक तुमच्या मतांना महत्त्व देणार आहे. तुमचा सल्ला इतरांसाठी उपयोगी ठरणार आहे. गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे.
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हे गोचर अत्यंत फलदायी ठरणार आहे. कारण शुक्र हा तुमच्या राशीचा स्वामी असून या काळात तो तुमच्या लग्न भावातून भ्रमण करणार आहे. विवाहितांचं वैवाहिक जीवन आनंदी आणि संतुलित राहणार आहे. समाजात मान, प्रतिष्ठा आणि सन्मान वाढणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.