
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह ठराविक काळाने एकमेकांच्या सोबत येतात. याला ‘युती’ म्हणतात आणि याचा थेट परिणाम माणसाच्या जीवनावर होत असतो. अनेकदा याचा परिणाम देशातील घडामोडींवरही होतो. येत्या काही दिवसांत बुध आणि सूर्याची युती होऊन ‘बुधादित्य राजयोग’ तयार होणार आहे.
सूर्य १७ सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश करणार असून बुध १५ सप्टेंबर रोजीच कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या दोन ग्रहांच्या संगतीने तयार होणारा हा योग काही राशींना प्रचंड यश मिळवून देणार आहे. करिअर आणि व्यवसायात मोठी प्रगती होईल. त्याचप्रमाणे उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता आहे.
कन्या राशींसाठी बुधादित्य राजयोग अत्यंत सकारात्मक परिणाम देणारा ठरेल. हा योग तुमच्या पहिल्याच भावात तयार होत असल्याने तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. मान-सन्मानात भर पडणार आहे. पार्टनरशिपमध्ये काम करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांना एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची साथ लाभेल.
मकर राशींसाठी हा योग भाग्यवृद्धीचा काळ ठरणार आहे. कारण बुधादित्य राजयोग तुमच्या नवव्या भावात आणि परदेशसंबंधित स्थानी तयार होणार आहे. या काळात अचानक भाग्योदय होईल. धार्मिक किंवा मांगलिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. नोकरी करणाऱ्यांना ऑफिसच्या कामानिमित्त लांब पल्ल्याच्या प्रवासाची संधी मिळणार आहे.
धनु राशीसाठी हा योग विशेष फलदायी ठरेल. कारण बुधादित्य राजयोग तुमच्या दहाव्या भावात तयार होतोय. जो कर्म आणि करिअरशी संबंधित आहे. या काळात कामधंद्यात प्रगती होईल. करिअरशी निगडित ताणतणाव कमी होणार आहे. नोकरीत वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचाही पाठिंबा लाभणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.