Sunita Ahuja: ज्येष्ठ अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता आहुजाने पुतण्या कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी काश्मीरा शाह यांच्यासोबत अनेक वर्षे सुरू असलेल्या कौटुंबिक वादाबाबत मोठा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत बोलताना सुनीता यांनी हा वाद कसा संपला, याबद्दल सविस्तर सांगितले. त्यांच्या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे.
लॉक अप याशोमध्ये सुनीता आहुजा म्हणाली की, कृष्णाला तिने स्वतःच्या मुलासारखे वाढवले. त्यामुळे त्याच्याशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांना खूप मानसिक त्रास झाला होता. मात्र, नाते कायमचे तुटू नयेत, अशी तिची नेहमीच इच्छा होती. वाद संपुष्टात येण्यामागचा प्रसंग सांगताना सुनीता म्हणाली, "काश्मीरा माझ्या पायांवर पडली आणि तिने मनापासून माफी मागितली. त्यानंतर मीही सगळ्या गोष्टी मागे सोडण्याचा निर्णय घेतला." तिने स्पष्ट केले की, नात्यांमध्ये अहंकारापेक्षा प्रेम आणि आपुलकी अधिक महत्त्वाची असते. त्यामुळे जुन्या कटु आठवणी विसरून त्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला.
सुनीताने हेही सांगितले की, कृष्णावर तिचे आजही तितकेच प्रेम आहे. राग किंवा मतभेद असले तरी तो त्यांचा पुतण्या आहे आणि त्याच्याविषयीच्या भावना कधीच बदलल्या नाहीत. कुटुंब एकत्र राहावे, हीच त्यांची कायम इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांत गोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच्यातील दुरावा अनेकदा चर्चेत राहिला होता. विविध मुलाखती आणि टीव्ही कार्यक्रमांमधून या वादाचा उल्लेख झाला होता. त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये नेमके काय सुरू आहे, याबाबत चाहत्यांमध्येही उत्सुकता होती. आता सुनीता आहुजा यांनी केलेल्या या खुलाशानंतर कृष्णा आणि काश्मीरासोबतचे संबंध पूर्ववत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.