Jiya Shankar Cried : बिग बॉस ओटीटी सीझन 2 च्या वीकेंड का वार एपिसोडकडे प्रेक्षकांना नजरा लागल्या होत्या. कारण या दिवशी सलमान खान सर्व स्पर्धकांची शाळा अघेतो. या भगत सलमान खान स्पर्धकांना सुनावतो तसेच काही चांगलं केलं असल्याचं त्याचं कौतुक देखील करतो. सलमान खानमुळे हा एपिसोडला चार चाँद लागतात. हार तुम्ही या आठवड्यातील वीकेंड का वार मिस केलं असेल तर तुम्हासाठी त्यातील अपडेट.
वीकेंड का वारमधील एका टास्क दरम्यान, जिया शंकर आणि मनीषा राणी यांना एकमेकांना व्यक्तिमत्त्वाला वैशिष्ट्य टॅग द्यायला सांगिले होते. मनीषाने जियाला भित्री, गोंधळलेली, चपळ, दुटप्पी, आक्रमक, निरुपयोगी आणि खोडकर असे टॅग दिले. मनिषाने तिच्या प्रत्येक टॅगचे जस्टिफिकेशन देण्यासाठी विविध घटना सांगितल्या.
दुसरीकडे, जियाने मनीषाला अटेन्शन सीकर, आत्ममग्न, हट्टी, धूर्त, दुहेरी मनाची, फॉलोवर आणि अति-स्मार्ट असे लेबल लावले. जियाने मनीषाला दिलेल्या प्रत्येक गुणाचे स्पष्टीकरण देखील दिले. (Latest Entertainment News)
शोच्य फॉरमॅटनुसार प्रेक्षक आणि स्पर्धक यांना थेट संवाद साधण्याची परवानगी देण्यात आली. प्रेक्षकांमधील एकाने थेट जिया शंकरशी संवाद साधला. पलक पुरस्वानी घरात असताना जियाच्या कथित दुटप्पीपणाबद्दल त्या व्यक्तीने मुद्दा मांडला. त्यांनी निदर्शनास आणून दिले की जियाने पलकशी मैत्री कायम ठेवत अविनाश सचदेव आणि फलक नाझपासून स्वतःला दूर केले आणि जिया इतरांवर अवलंबून राहते असे त्याने सांगितले.
या प्रश्नाचे उत्तर देताना जियाने स्पष्ट केले की जेव्हा पलकने या शोमध्ये येईल असे तेव्हा तिला कधीच वाटले नव्हते. त्यांची पुन्हा मैत्री होईल असे जायला वाटले नव्हते. पण शेवटी त्यांनी एकमेकांशी बोलून सर्व क्लियर केले. तसेच तिला पलकसोबत वेळ घालवायला मिळाला याचा तिला आनंद आहे.
अविनाश आणि फलकबद्दल बोलताना जिया म्हणाली की सुरुवातीच्या काळात ती सर्वांसोबत होते आणि मित्र बनवण्यासाठी ती लोकांना निवडत असल्याने ती सर्वांशी बोलत होती.
कर्णधारपद हा या आठवड्यात सर्वाधिक चर्चेचा विषय असल्याने, सलमान खानने या कार्याची घोषणा केली ज्यामध्ये अभिषेक मल्हान, फलाक नाझ, जिया शंकर आणि जद हदीद यांचा समावेश होता, जे आतापर्यंत घरचे कर्णधार होते.
बीबी व्हर्सच्या खोलीत, चार स्पर्धकांना बोलावण्यात आले आणि त्यांना कारणे सांगितली की ते सर्वोत्तम कर्णधार बनतील असा विश्वास त्यांना आहे का? इतर तीन उमेदवार या भूमिकेसाठी अयोग्य का आहेत हे देखील त्यांना स्पष्ट करणे आवश्यक होते. प्रत्येक स्पर्धकाने आपले मत मांडले.
सर्व 4 जणांनी सांगितले की ते घरातील सर्वोत्तम कर्णधार का आहेत. त्यानंतर इतर स्पर्धकांना त्यांच्यापैकी 4 मधून एक नाव निवडण्यास सांगितले गेले. जो कधीच घराचा कर्णधार होण्यास पात्र नाही. स्पर्धकांनी अभिषेक मल्हानची निवड केली. त्यामुळे अभिषेकची कर्णधारपदावरून कायमची हकालपट्टी करण्यात आली.
जिया शंकर आणि अभिषेक मल्हान व्यतिरिक्त, बिग बॉस OTT वर या आठवड्यासाठी नामांकित स्पर्धक अविनाश सचदेव, फलक नाझ, बेबीका धुर्वे, मनीषा राणी, पूजा भट्ट आणि सायरस ब्रोचा होते.
सुरुवातीला सलमान खानने सायरस, पूजा आणि मनीषा यांना सुरक्षित असल्याचे घोषित केले आणि बेबीकाला बाहेर जाण्यास सांगितले. नंतर त्याने सांगितले केला की बेबीका देखील सुरक्षित आहे. त्यानंतर सलमानने जाहीर केले की या आठवड्यात कोणीच नॉमिनेट होणार नाही , या बातमीने घरातील सदस्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
बिग बॉस ओटीटी सीझन 2 च्या वीकेंड एपिसोडमध्ये टेरेन्स लुईसने विशेष उपस्थिती लावली. तो स्पर्धकांना भेटण्यासाठी घरात गेला होता. दरम्यान त्याने एक टास्क देखील घेतला. टास्कमध्ये, स्क्रीनवर कमेंट लिहिलेल्या होत्या आणि स्पर्धकांना अंदाज लावायचा होता की कोणाविषयी कोणी कमेंट केली आहे.
जर त्यांनी अचूक अंदाज लावला तर त्यांना त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर घाण पाणी टाकावे लागले. टास्क दरम्यान, फलक नाझला पुढे बोलावले गेले आणि तिच्यावर कोणी टिप्पणी केली आहे याचा अंदाज घेण्यास सांगितले. तर तिने घाण पाणी घेतले आणि मनीषाच्या चेहऱ्यावर ओतले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.