आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट

अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी एकमेकांपासून १५ वर्षांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट
आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट Saam Tv

मुंबई - अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी एकमेकांपासून १५ वर्षांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी घटस्फोटाविषयी अधिकृत स्टेटमेंट देखील जारी केले आहे. दोघांनी एक जॉइंट स्टेटमेंट जारी करत त्यांच्या घटस्फोटाविषयी माहिती दिली आहे. आमिर आणि किरणचा १५ वर्षांचा संसार मोडल्याने त्यांच्या चाहत्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे.

त्यांनी जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये ते म्हणले की, १५ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर आता आम्ही घटस्फोट घेत घेत आहोत. आम्हाला आता आयुष्यात नवीन चॅप्टरची सुरुवात करायची आहे. पती-पत्नी म्हणून नाही तर सह-पालक आणि एकमेकांसाठी कुटुंबातील एक सदस्य असू. या दोघांच्या घटस्फोट मागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट
हिंगोलीचा बिस्मिल्ला पठाण मुंबईत गावातील रुग्णांसाठी ठरतोय देवदूत

आमिर खानचे याआधी रीना दत्ता यांच्या सोबत लग्न झाले होते त्यानंतर २००२ साली त्यांचा घटस्फोट झाला. १६ वर्षांनी आमिरने रीनाला घटस्फोट दिला होता. रीना आणि आमिरला दोन मुले आहेत. २८ डिसेंबर २००५ मध्ये किरण राव आणि आमिर खान यांचे लग्न झाले. तर २०११ मध्ये मुलगा आझादचा जन्म झाला होता.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com