
प्रतापगढ : उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यातून खळबळजनक घटना समोर आली आहे. एक नवविवाहित कपल हनिमूनला सिक्किम येथे गेलं होतं. पण त्यांच्या या जीवनप्रवासात दु:खद घटनेचं वळण लागलं. रहाटीकर गावातील रहिवासी कौशलेंद्र सिंह आणि त्याची पत्नी अंकिता सिंह २४ मे रोजी सिक्किमला गेले होते. २९ मे रोजी संध्याकाळी त्यांची ट्रॅव्हलर व्हॅन मगन जिल्ह्यात १००० फूट खोल दरीत कोसळली.
वाहनासोबतच ते नदीत वाहून गेले, पण अजूनही त्यांचा पत्ता लागला नाहीय. दरम्यान, या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. दर दोनजण जखमी झाले आहेत. तसच कौशलेंद्र आणि अंकितासह ८ प्रवासी अजूनही बेपत्ता आहेत. या घटनेनंतर एनडीआरफच्या टीमकडून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. खराब हवामानामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडचणी येत असल्याचं समजत आहे.
कौशलेंद्र आणि अंकिताचं लग्न ५ मे रोजी झालं होतं. या घटनेमुळं त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर पसरला आहे. कौशलेंद्रचे वडील शेर बहादूर सिंह त्यांच्या कुटुंबियांसोबत सिक्किमला पोहोचले आहेत. स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून दोघांचाही शोध घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत.
सिक्किमच्या हॉटेलमधून या कपलचं सामान ताब्यात घेण्यात आलं आहे. कुटुंबियांनी उत्तर प्रदेश आणि सिक्किम सरकारला आवाहन केलं आहे की, सर्च ऑपरेशन वेगानं सुरु करावं. जेणेकरून एखादा पुरावा सापडेल. घटना घडल्यानंतर जवळपास ८ दिवसानंतरही कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाहीय. कौशलेंद्र आणि अंकिता कुठे आहेत? हा सवाल आता उपस्थित होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.