
केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवली आहे. गरीब कुटुंबातील नागरिकांना रेशन कार्ड दिले जाते. रेशन कार्डवर नागरिकांना मोफत अन्नधान्य मिळते. यामुळे त्यांचा खर्च कमी होतो. तुमच्या जवळच्या रेशन दुकानावर जाऊन तुम्ही धान्य घेऊ शकतात. यामध्ये गहू, तांदूळ, तेल अशा अनेक गोष्टींचा समावेश आहेत. या गोष्टी तुम्हाला कमी किंमतीत किंवा मोफत मिळतात.
देशातील कोट्यवधी नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत. ज्या लोकांकडे रेशन कार्ड आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु आता अनेकांचे रेशन कार्ड बंद होणार आहे. ज्या नागरिकांना रेशन कार्ड केवायसी केले नाही त्यांचे कार्ड आता बंद होणार आहे. त्यामुळे तुम्ही आजच हे काम करा.
केवायसी करण्याची शेवटची तारीख
केंद्र सरकारने नागरिकांना रेशन कार्ड केवायसी (KYC) करणे अनिवार्य केले आहे. यासाठी सरकारने अंतिम मुदत आधीच दिली होती. मात्र, ही मुदत वाढवून ३१ मार्च करण्यात आली आहे. तर जर तुम्ही अजूनही ई-केवायसी केले नसेल तर तुम्ही केवायसी करावे.
ई-केवायसी करण्याची प्रोसेस (Ration Card KYC Process)
रेशन कार्डधारक फक्त आजपर्यंतच ई केवायसी करु शकतात. त्यासाठी तुम्हाला जवळच्या रेशन कार्ड दुकानात जावे लागेल. रेशन कार्ड दुकानात जाऊन तुम्ही बायोमॅट्रिक करु शकतात. बायोमॅट्रिक करुन तुम्ही केवायसी पूर्ण करु शकतात. यासाठी तुम्हाला रेशन कार्ड सोबत घेऊन जायचे आहे.
रेशन कार्ड हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. नारंगी, पांढरे असे रेशन कार्ड असतात. हे रेशन कार्ड नागरिकांच्या उत्पन्नानुसार त्यांना दिले जातात. त्यानुसारच त्यांना मोफत अन्नधान्य दिले जाते. त्यांचे उत्पन्न जर जास्त असेल तर त्यांना मोफत रेशन कार्ड मिळत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.