
पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची बातमी
या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा हप्ता
हप्ता मिळण्याआधी हे काम करा
भारतात लाखो लोक शेती करतात.भारत देश हा कृषीप्रधान आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने खास योजना सुरु केली आहे. केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुरु केली आहे.या योजनेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. या योजनेत एकूण ६००० रुपये दिले जातात.
पीएम किसान योजनेत वर्षभरात तीन हप्ते दिले जातात. ४ महिन्यानंतर २००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात.या योजनेच्या २१ वा हप्ता आता दिला जाणार आहे. दरम्यान, हा हप्ता लवकरच दिला जाईल. कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे दिले जातात.
या शेतकऱ्यांना मिळणार नाही २१वा हप्ता (These Farmer Will Not Get PM Kisan Yojana Installment)
काही शेतकऱ्यांना २१वा हप्ता दिला जाणार आहे. सरकारच्या काही नियमांचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांनाच हप्ता मिळणार आहे, जर तुम्ही या नियमांचे पालन केले नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत.
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असणे गरजेचे आहे. जर तुमचे आधार कार्ड लिंक नसेल तर खात्यात पैसे जमा केले जाणार नाहीत. जर तुम्ही आधार कार्ड आणि बँक कार्ड लिंक केले नसेल तर लगेच जाऊन करा. याचसोबत तुमचे कागदपत्र अपडेट असणे गरजेचे आहे.
ज्या शेतकऱ्यांना जमिनीचे रेकॉर्ड अपलोड केले नाहीत. त्यांनादेखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. याचसोबत जर तुमचा बँक अकाउंट नंबर चुकीचा असेल, आयएफएससी कोड चुकीचा टाकला असेल तरीही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.