
पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट
२१वा हप्ता लवकरच दिला जाणार
पीएम किसान योजनेच्या नियमांत बदल
पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पीएम किसान योजनेत आतापर्यंत २० हप्ते जमा केले आहेत. त्यानंतर आता शेतकरी २१व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, आता पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना पुढचा हप्ता मिळण्यास अडचणी येऊ शकतात.
या शेतकऱ्यांना होणार फायदा
सरकारने पीएम किसान योजनेत एक नवीन तरतूद केली आहे. यामुळे सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ घेता येणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जमिनीची आवश्यक कागदपत्रे आहेत. त्यांना या योजनेअंतर्गत पैसे मिळणार आहे. अशा परिस्थितीत, राज्य सरकारला तो शेतकरी प्रत्यक्षात शेती करतो, हे दाखवावे लागेल. या पडताळणीनंतरच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
दिवाळीपर्यंत येऊ शकतो पुढचा हप्ता
देशभरातली शेतकरी सध्या २१व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. सरकारने संकेत दिले आहेत की, दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा होऊ शकतात. त्यामुळे यावेळी शेतकऱ्यांची दिवाळी आणखी गोड होणार आहे.
पैसे कोणाला मिळणार?
पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता देताना काही नियमांमध्ये बदल केला जाईल. या योजनेत केंद्र सरकारने पुरग्रस्त राज्यांमधील शेतकऱ्यांना प्रथम लाभ दिला जाईल, असे सांगितले आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेश, पंजाबमधील शेतकऱ्यांना पहिल्यांदा योजनेचा लाभ मिळू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.