

बिहार सरकारची महिला रोजगार योजना
महिलांना मिळतात १०,००० रुपये
अर्ज करण्यासाठी उरले शेवटचे ३ दिवस
केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्याचसोबत विविध राज्य सरकारनेही महिलांसाठी योजना राबवल्या आहेत. बिहार सरकारने महिलांसाठी खास महिला रोजगार योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना १०,००० रुपये मिळतात. दरम्यान, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अवघे ३ दिवस उरले आहेत. तुम्ही ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज करु शकतात.
३१ डिसेंबर २०२५ नंतर तुम्हाला महिला रोजगार योजनेत अर्ज करता येणार नाहीये. त्यामुळे महिलांसाठी ही शेवटची संधी आहे. बिहार सरकारची महिला रोजगार योजनेत महिलांना फक्त आर्थिक मदत नव्हे तर त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी मदत केली जाते. ही बिहारी सर्वाधिक लोकप्रिय झालेली योजना आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करावा हे जाणून घ्या.
महिला रोजगार योजना ही बिहार विधानसभा निवडणुकीसाठी गेम चेंजर ठरली. या योजनेत अजूनही ज्या महिलांनी अर्ज केलेला नाही त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे. या योजनेत तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.
अर्ज करण्याची प्रोसेस
महिला रोजगार योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला बचत गटाशी जोडलेल्या असायला हव्यात. ग्रामीण भागातील महिलांना जवळच्या ग्राम विकास ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करायचा आहे. तर शहरी भागातील महिलांना अधिकृत वेबसाइटवरुन अर्ज करता येणार आहे. याबाबतची पात्रता, अटी या सर्व वेबसाइटवर देण्यात आली आहे.
महिलांना मिळतात १०,००० रुपये
बिहारच्या या योजनेत महिलांना १०,००० रुपये दिले जातात. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. बचत गटातील महिलांना लहान व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार मदत करते. या योजनेसाठी तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करु शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.