MNREGA Scheme: मोठी बातमी! मनरेगा योजनेचे नाव बदलणार, मोदी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

PM Narendra Modi: मनरेगा योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मनरेगा योजनेचे नाव बदलण्यात येणार आहे. मोदी सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला. मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.
MNREGA Scheme: मोठी बातमी! मनरेगा योजनेचे नाव बदलणार, मोदी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
PM Narendra Modi saam tv
Published On

Summary -

  • केंद्र सरकारने मनरेगा योजनेचा नाव बदलण्याचा निर्णय घेतला

  • मनरेगा योजनेचे नाव बदलून पूज्य बापू ग्रामीण रोजगार हमी योजना करण्यात येणार

  • केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत याला मंजुरी देण्यात आली

  • १०० ते १२५ दिवस रोजगाराची हमी कायम ठेवण्यात आली आहे

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकार मनरेगा योजनेचे नाव बदलणार आहे. शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. सरकार मनरेगा योजनेचे नाव बदलून पूज्य बापू ग्रामीण रोजगार हमी योजना असे ठेवणार असल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेद्वारे ग्रामीण भागातील गरिबांना दरवर्षी १२५ दिवस काम मिळेल. या योजनेसाठी सरकार १.५१ लाख कोटी रुपये वाटप करणार आहे.

मनरेगा योजना २००५ मध्ये तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने सुरू केली होती. सुरुवातीला राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या योजनेचे नंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) असे नामकरण करण्यात आले होते. ही योजना भारतीय कामगार कायदा आणि सामाजिक सुरक्षा उपाय आहे. ज्याचा उद्देश काम करण्याचा अधिकार ही हमी देणे आहे. २००५ पासून १५४ दशलक्ष लोक या योजनेअंतर्गत सक्रियपणे काम करत आहेत.

MNREGA Scheme: मोठी बातमी! मनरेगा योजनेचे नाव बदलणार, मोदी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
Wardha : मनरेगा अंतर्गत विहिरीचे पैसे थकले; संतप्त शेतकऱ्यांचे विहिरीत उतरून अन्नत्याग आंदोलन

आता केंद्र सरकार मनरेगा योजनेच्या नावात बदल करणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात मिळाली आहे. नाव बदलण्या संदर्भातील प्रस्ताव ग्रामीण विकास मंत्रालयाने तयार केला आहे. या योजनेचे नाव बदलणार असले तरी १०० दिवसांच्या रोजगाराची हमीमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

MNREGA Scheme: मोठी बातमी! मनरेगा योजनेचे नाव बदलणार, मोदी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
Amravati Breaking : मनरेगा कामगारांना निकृष्ट भोजन;दिलं होतं दोन दिवस आधीचं जेवण, पाहा व्हिडीओ

दरम्यान, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायद्याला हिंदीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा असे म्हणतात. मनरेगा ही योजना भारत सरकारद्वारे लागू करण्यात आलेली रोजगार हमी योजना आहे. ही योजना ७ सप्टेंबर २००५ रोजी सुरू करण्यात आली आणि तेव्हा या योजनेला विधानसभेत मंजुरी मिळाली.

त्यानंतर २ फेब्रुवारी २००६ मध्ये २०० जिल्ह्यांमध्ये या योजनेला सुरूवात झाली. सुरूवातीला या योजनेला राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा म्हटले जायचे. पण २ ऑक्टोबर २००९ पासून तिचे नामकरण करून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा असे करण्यात आले होते. आता पुन्हा या योजनेचा नाव बदलण्यात येणार आहे.

MNREGA Scheme: मोठी बातमी! मनरेगा योजनेचे नाव बदलणार, मोदी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
Nanded News : पत्नीचे दागिने मोडून खोदली विहीर; मनरेगा अंतर्गत विहिरीच्या अनुदानाची प्रतीक्षाच, शेतकऱ्यांनी दिला उपोषणाचा इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com