आज १० मे रोजी संपूर्ण देशभरात अक्षय्य तृतीया साजरी केली जात आहे. अक्षय्य तृतीयेच्या मूहूर्तावर लोक अनेक नवीन वस्तू खरेदी करतात. अक्षय तृतीयेला लोक कार, सोने खरेदी करतात. कार खरेदी करण्यासाठी अक्षय्य तृतीयेचा मूहूर्त चांगला असल्याचे मानले जाते. त्यामुळेच दरवर्षी अक्षय्य तृतीयेला कार खरेदी करण्याच्या संख्येत वाढ होते. यंदाच्या वर्षी कार खरेदीच्या संख्येत जवळपास ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार, सणात कालावधीत वाहन नोंदणीत २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर दुचाकींच्या रजिस्ट्रेशनमध्ये १९ टक्क्यांनी वाढ जाली आहे. मुंबईत बोरिवली आरटीओमध्ये सर्वाधिक कार म्हणजेच ४८९ कारची नोंदणी झाली आहे. तर वडाळा आरटीओमध्ये ८३५ दुचाकी वाहनांची नोंदणी झाली आहे.
यंदा अक्षय्य तृतीयेला जवळपास १,५०० नवीन कार आणि २,७०० पेक्षा अधिक दुचाकींची डिलिव्हरी होणार आहे. मागील आठवड्यात सर्वाधिक वाहनांचे रजिस्ट्रेशन झाले होते. शुभ मूहूर्तावर नवीन वाहन घेण्यासाठी लोक उत्सुक असतात. त्यामुळेच अक्षय्य तृतीया, गुढीपाडवा, लक्ष्मी पूजन या दिवसांत मुंबईत सर्वाधिक वाहने खरेदी केली जातात. तसेच नवीन व्यवसाय सुरु करणे, सोने चांदी घेण्यासाठीही हा उत्तम मूहूर्त असल्याचे मानले जाते.
अक्षय्य तृतीयेसाठी जवळपास १६२ नवीन इलेक्ट्रिक वाहने बुक करण्याच आली आहेत. तर जवळपास ५४६ सीएनजी कारची नोंदणी झाली आहे. मुंबईतील वाहनांची संख्या ४६ लाखांच्या पुढे गेली आहे. यात १३ लाख कार तर २८ लाख दुचाकी आहे. देशातील सर्वाधिक वाहने ही मुंबई शहरात आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.