महायुती सरकार स्थापन होऊन शंभर दिवस उलटूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजूनही वर्षा निवासस्थानी आपला मुक्काम हलवला नाहीये. त्यामुळे फडणवीस वर्षा निवासस्थानी का जात नाही अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर मंत्र्याना देखील अजूनही त्यांचे बंगले मिळाले नाहीये. ते सुद्धा अजूनही फ्लॅट मध्ये राहत आहे. मध्यंतरी देवेंद्र फडणवीसांना हा प्रश्न विचारला असता त्यांनी मुलीची परीक्षा सुरू आहे. परीक्षा संपल्यावर आपण तिकडे जाणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले होते.
मात्र अजूनही ते वर्षा निवासस्थानी गेले नसल्यामुळे विविध राजकीय तर्क वितर्क लावले जात आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार वर्षा निवासस्थानी काही डागडुजीचे काम सुरू झाले आहे. हे काम झाल्यावर देवेंद्र फडणवीस हे आपला कारभार तिथून चालवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.