अंतराळातून परतेल्या अंतराळवीरांना पृथ्वीवर परतल्यावर काय समस्यांना सामोरे जावे लागते, तुम्हाला माहितीये का? ९ महिन्यांनी सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी सुखरूप पृथ्वीवर परतले आहेत. स्पेसमधून परतल्यानंतर शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी त्यांना काही उपचारपद्धतींचा आधार घ्यावा लागणार आहे.जेव्हा अंतराळवीर अंतराळातून परतात. तेव्हा बॅक्टेरिया, पॅरासाईट किंवा दूषित वायू त्यांच्यासोबत येऊ शकतात. ज्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे त्यांना काही दिवस विश्रांतीसाठी क्वारंटाईन केलं जाईल, अशी माहिती खगोलशास्त्रज्ञ लिना बोकील यांनी दिली आहे. तसेच त्यांना औषधांसोबत काही सप्लिमेंट देखील देण्यात येतील. कारण अंतराळात हाडांची घनता कमी होते. कारण अंतराळात ग्रीपवर सुद्धा नियंत्रण करता येत नाही. त्यामुळे आता परतल्यावर त्यांना पूर्ण विश्रांती देण्यात येईल, असंही त्या म्हणाल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.