मराठवाडा विभागात गेल्या १७ दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सततच्या वादळी वाऱ्यासह गारपीट आणि विजांच्या कडकडाटामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. ३ मेपासून सुरू झालेल्या या हवामान बदलामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
या १७ दिवसांमध्ये वीज पडून २७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ३९१ जनावरे दगावली आहेत. याशिवाय ४ हजारांहून अधिक हेक्टरवरील उन्हाळी आणि बागायती पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. अचानक आभाळ भरून येणे, वीजांचा प्रचंड कडकडाट आणि रोज पडणारा पाऊस यामुळे बळीराजा अक्षरशः हतबल झाला आहे.
शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना योग्य तो आर्थिक मदत दिली जावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.