Dharashiv News: धाराशिवच्या परंडा तालुक्यातील खंडेश्वरवाडी प्रकल्पाची तात्काळ दुरुस्ती करावी या मागणीसाठी भूम उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. ग्रामस्थांकडून वारंवार मागणी करूनही सदरील प्रकल्पाच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी प्रशासनाकडून वेळ काढू पणा केला जात असून त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठे हाल होताना पाहायला मिळत आहेत.याच अनुषंगाने शेतकरी आज चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर चक्काजाम करत प्रशासनाला जाब विचारण्यात आला. येत्या पंधरा दिवसात काम सुरू करा अन्यथा प्रकल्पात जलसमाधी आंदोलन करू असा इशारा यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी दिलाय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.