ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकारपिरषद पार पडली. यादरम्यान त्यांनी धारावीतील टेंडरवरुन सरकारवर निशाणा साधला आहे. वारेमाप एफएसआय अडाणीला दिला जातोय. एकूण टेंडरमध्ये वाढीव टीडीआरचा उल्लेख नसल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. धारावीकरांना पात्र अपात्रतेच्या चक्रात अडकवून त्यांना हकलवून द्यायचं कारस्थान सरकारकडून करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. परंतु धारावीकरांना तिथून हकललं जाऊ देणार नाही म्हणत त्यांच्या पाठीशी उभे असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. ही सर्वी कारस्थानं मुंबईचं नागरी संतुलन बिघडवायचं काम असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. भूखंडाचं श्रीखंड लावण्याचं यांचं काम असं म्हणत ठाकरेंनी सरकारचे कान टोचले आहेत. https://www.youtube.com/watch?v=dhKeOBa-biA
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.