एकनाथ शिंदेंच्या जवळच्या माणसांवर कारवाईची ही तर सुरुवात आहे. अजून ऑगस्टपर्यंत खूप काही घडायचंय, असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय. तर आता बदल होणार आहे आणि तुमच्या मालकाचं म्हणजेच उद्धव ठाकरेंचं राजकारण पूर्णपणे संपणार आहे, असा पलटवार रामदास कदमांनी केलाय.
शिंदे यांच्या जवळच्या लोकांवर भविष्यात नक्कीच कारवाया होणार आहेत. त्याप्रकारचे अस्सल पुरावे केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. यापुढे त्यांना वाचवणारी शक्ती दिल्लीत कमकुवत होताना दिसत आहे. शिंदेंपेक्षा दिल्ली मला जास्त माहीत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामाची पद्धतही मला माहीत आहे. इन्कम टॅक्स नोटीस मी फार गांभीर्याने घेत नाही. हा एक इशारा आहे. यापेक्षा वेगळ्या घडामोडी साधारण ऑगस्टच्या अखेरपर्यंत घडतील, असा खळबळ उडवून देणारा दावा संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत यांच्या टीकेला रामदास कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. तुम्ही म्हणालात की महाराष्ट्रात आता बदल होणार आहे. ही गोष्ट खरी आहे. आता नक्कीच बदल होणार आहे. आता तुमच्या मालकाचं म्हणजेच उद्धव ठाकरेंचं राजकारण पूर्णपणे संपणार आहे. जे १५-२० आमदार आहेत, ते एक-दीड वर्षात कळेल की काही शिल्लक राहणार नाही. हा मोठा बदल होणार आहे. उद्याच्या महापालिका निवडणुकीत कळेल. दूध का दूध आणि पानी का पानी होणार आहे, असे रामदास कदम म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.