हिंगोली : हिंगोलीत नागेश पाटील आष्टीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले, यादरम्यान भाषणात त्यांनी मोदी सरकारवर घणाघात केला आहे. ज्याचा जितका मोठा भ्रष्टाचार त्याचा मोठा सन्मान, आदर्श घोटाळा केलात मग राज्य सभेवर जा. सत्तर हजार कोटींचा घोटाळा केलात मग उपमुख्यमंत्री व्हा. सत्तर हजार कोटींचा घोटाळा जर उपमुख्यमंत्री करत असतील तर मुख्यमत्र्यांचा घोटाळा किती असेल? असाही सवाल उपस्थित करत दिल्लीचा रस्ता बंद करून मोदींना आता रोखायला पाहिजे, असा इशारा ठाकरेंनी मोदींना दिला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.