ज्या लोकांना जनतेनं चार वेळा डांबर फासलंय त्या लोकांवर मला काही बोलायचं नाही असं म्हणत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिवसेना उबाठा उपनेते बाळ यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच वैयक्तिक स्तरावर टीकेची प्रथा रत्नागिरीत येणार नाही असं वाटत होतं. पण काही लोकांनी वैयक्तिक पातळीवर टीका करण्याची प्रथा रत्नागिरीत सुरू केली आहे. पण मी संयमी आहे. समोरच्यावर जास्त टीका करत नाही. तसेच जे राजकिय संपलेले आहेत. त्यांना नाव घेऊन मोठं देखील करत नाही, असं देखील सामंत यावेळी म्हणाले. दरम्यान संपलेलं राजकिय अस्तित्व टिकवण्यासाठी काही लोकं धडपड करत असतात. माझ्यावर टीका झाली की समजून जायचं निवडणूक आली आहे. असा टोलाही सामंत यांनी यावेळी लगावला. पाच वर्षानंतर हे उगवतात. पण रत्नागिरीची जनता माझ्यावर भरभरून प्रेम करते. त्यामुळे टीकेला उत्तर देणं गरजेचं आहे. असं मला वाटत नाही असंही सामंत यावेळी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.