रत्नागिरी : महायुतीमधील जागा वाटपाचा पेच कधी सुटणार, हा प्रश्न कायम असताना आता उदय सामंत यांची मोठी प्रतिक्रिया समोर आलीय. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या उमेदवारीवरुन शिवसेनेचा दावा कायम असल्याचं या निमित्तानं समोर आलंय. शिवसेनेसह भाजपही सिंधुदुर्गच्या जागेसाठी आग्रही आहे. अशातच उदय सामंत यांचे बंधूही या लोकसभा मतदार संघात जोरदार तयारी करत असल्याचं वृत्त समोर आलेलं होतं. अशातच उदय सामंत यांनी तळकोकणातल्या या जागेवर शिवसेनेचा दावा असल्याचं पुन्हा एकदा नमूद केलंय. तर दुसरीकडे भाजपही या जागेसाठी मोर्चेबांधणी करते आहे. पण महत्त्वाचे म्हणजे सिंधुदुर्गच्या जागेवरुन कोणताही वाद नाही, असं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय. नुकतीच आपण नारायण राणे यांची काही खासगी कारणासाठी भेटही घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे आता महायुतीकडून रत्नागिरी सिंधुदुर्गचा उमेदवार नेमका कोण असणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.