शिवसेनेचे महापौर कोकणातील होते. बाळासाहेब ठाकरेंसोबत असणारे बहुतांश शाखाप्रमुख हे कोकणातीलच होते. शिवसेनेची पहिली फळी ही कोकणातील होते. मुंबईमध्ये कोकणातील लोकांना महत्त्व आहे. कोकणकरांना मुंबईत सन्मानाचे नाव राहील, असे योगेश कदम म्हणाले.
ठाकरेंची शिवसेना संपली तर मुंबईतून मराठी माणूस संपेल, अशी भीती आहे, त्यावर योगेश कदम यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, मराठी माणसाच्या मनात अशी शंका नाही. ठाकरे मुंबईत संपले तर मराठी माणूस संपले, हा त्यांनी (ठाकरे) तयार केलेला प्रपोगंडा आहे. त्यांचा हा शेवटचा पर्याय आहे. मराठी माणसासाठी काय केले, ते सांगू शकत नाहीत. कारण त्यांनी काही केलेलेच नाही. मराठी माणूस मुंबईतून कधीच संपणार नाही. मुंबईचा महापौर हा मराठीच होईल, प्रधान्य मराठीच असेल, असे राज्य मंत्री योगेश कदम म्हणाले. ठाकरे संपले म्हणून मराठी संपली हे अजितबात होणार नाही, असे कदम म्हणाले. ठाकरे म्हणजे मराठी, हा भ्रम मराठी माणसाच्या मनातून निघालेला आहे, असे कदम म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.