महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही बंधूंनी काल सांगितले आहे. त्यांच्यातले काही मतभेद विसरून जर ते दोघे एकत्र येत असतील तर त्याचं आम्ही निश्चितच स्वागत करू. ज्या वेळेस दोन्ही ठाकरेंची ताकद महाराष्ट्रात एकत्र येईल आणि मराठी माणूस ज्यावेळेस एकत्र येईल तेव्हा काय परिणाम होईल हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली. सोलापूर येथे आले असता ते बोलत होते.
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली असताना अनेक नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. हर्षवर्धन पाटील हे ठाकरे कुटुंबियांचे व्याही देखील आहे. जर दोन्ही ठाकरे एकत्र होतील त्याचा काय परिणाम होईल हे सांगण्याची आवश्यकता नाही असे विधान हर्षवर्धन पाटील यांनी केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.