उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या दु:खद घटनेनंतर राज्याचे संपूर्ण मंत्रीमंडळ बारामतीत पोहोचले असून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिकांनी परिसरात गर्दी केली आहे. सर्वत्र शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार हे दिल्लीहून तातडीने बारामतीत पोहोचले. तसेच शरद पवार ही हेलिकॉप्टरने गेले. यावेळी त्यांनी साम टीव्हीशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार भावूक झाले. हा खूप मोठा धक्का आहे. राज्याला जे नुकसान झाले आहे ते भरून निघणार नाही. या घटनेत कोणतेही राजकारण नाही, हा निव्वळ अपघात आहे. यामध्ये कुठलेही राजकारण नाही असे ते म्हणाले. यावेळी बोलताना शरद पवारांचा कंठ दाटून आला होता आणि काही क्षण त्यांना शब्दही फुटत नव्हते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.