Video

आदिवासींच्या मागण्यांसाठी ‘लाल वादळ’ मुंबईच्या दिशेने रवाना, मंत्रालयाल घालणार घेराव|VIDEO

Adivasi Farmers March To Mantralaya: आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नाशिकहून निघालेले लाल वादळ मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालाय घेरावाचा इशारा देण्यात आला आहे.

Omkar Sonawane

आदिवासींच्या प्रलंबित मागण्यांसाठी तीन दिवसांपासून लाल वादळ नाशिक जिल्ह्यातील सुरगाणामधून निघाले आहे. भारतीय किसान सभा आणि माक्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे लाल वादळ रविवारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

हातात लाल झेंडा आणि मगाण्यांचे फलक घेऊन पायी निघालेल्या सुमारे 20 हजार मोर्चेकऱ्यांनी रविवारी 12 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 20 मिनिटे विश्रांती घेतली. यावेळी मागण्या झाल्या नाही तर 2 फेब्रुवारीला मुंबईत पोहोचल्यानंतर मंत्रालायला घेराव घालू, असा इशारा मोर्चकरांनी दिला.

त्यामुळे सरकार आता काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करावी, वनजमीन, गायरान धारकांना स्वतंत्र सातबारा उतारा मिळावा, शिक्षणाचे खासगीकरण थांबवा, पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी स्थानिकांना द्या या प्रमुख मागण्यांसाठी लाल वादळ रस्त्यावर उतरले आहे. हा मोर्चा माजी आमदार जे.पी गावित यांच्या नेतृत्वात निघाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

Fact Check: PM किसान योजनेची रक्कम दुप्पट? 24 व्या हप्त्यात 4000 रुपये जमा होणार?

SCROLL FOR NEXT