राज्यातील महाभरती रखडल्याने सर्व उमेदवारांकडून रोष व्यक्त केला जात आहे.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 75 हजार मेगाभरतीची मोठी घोषणा करण्यात आली.परंतु आता विविध टप्प्यांवर ही भरती रखडली आहे,त्यामुळे उमेदवारांमध्ये असंतोष पसरला आहे.त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे वय वाढवण्यात येण्याच्या चर्चा सुरु आहेत.या चर्चांमुळे देखील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे.राज्यातली 15 हून अधिक विभागातील भरती प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे.तलाठी आणि जिल्हा परिषदेची भरती परिक्षा होऊनही उमेदवारांना अजूनही नियुक्ती पत्र देण्यात आलं नाही.त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी ही विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.