रत्नागिरी जिल्ह्यात 13 आणि 14 जून रोजी हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. वेगवान वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. 13 आणि 14 जून रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाउस पडेल असं देखिल हवामान खात्याने म्हणले आहे.
त्याचबरोबर विजांचा गडगडाट होईल, तसेच ३० ते ४० प्रति तास किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रामध्ये जावू नये असे देखील सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर १५ आणि १६ जूनसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या दोन दिवशीसुध्दा मुसळधार ते अतिमुसळधार पाउस पडेल असा इशारा देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.