Rahul Gandhi Speech In Kolhapur SaamTv
Video

VIDEO : 'ही लढाई विचारधारांची'; राहुल गांधींनी सरकारवर ओढले ताशेरे

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांनी कोल्हापुरातून राज्य आणि केंद्र सरकारच्या कामकाजावर टीकेची झोड उठवलेली दिसली.

Saam Tv

विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा महाराष्ट्र दौरा झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी शनिवारी सकाळी कोल्हापूरच्या दौऱ्यावर पोहोचले. या दौऱ्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केलं. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी मोदी आणि महायुती सरकारवर टीकास्त्र डागलेलं दिसलं.

विचारधारा एकच आहे. त्यात कोणताही फरक नाही. ही राजकीय लढाई नाही, ही विचारधारांची लढाई आहे. ही संविधानाची लढाई आहे. त्यामुळे यापुढे तुमच्याकडे कुणी येऊन म्हणालं की, मी शिवाजी महाराजांना मानतो. तेव्हा तुम्ही त्यांना संविधान वाचवण्यावर प्रश्न विचारा. गरिबांच्या सुरक्षेचा प्रश्न विचारा. त्याने नाही, असे उत्तर दिले. तर त्या व्यक्तीने पुतळ्यापुढे हात जोडण्याला काही अर्थ नाही. महाराष्ट्रातील जनतेला हे चांगल्याप्रकारे माहिती आहे. संविधानात शिवाजी महाराजांचे विचार आहेत. त्यांना हा विचार महाराष्ट्राच्या मातीतून, जनतेतून मिळाला. मी जेव्हा महाराष्ट्रात येतो तेव्हा मला येथील जनतेच्या चेहऱ्यावर, त्यांच्या कर्मात, त्यांच्या मनात शिवाजी महाराजांचे विचार दिसून येतात, असंही राहुल गांधी यांनी म्हंटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर शहरातील जैन समाजाची जमीन संग्राम जगताप यांनी हडप केल्याचा आरोप

Parth Pawar: पार्थ पवारांवर १८०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Solapur News : सोलापूरमध्ये धक्कादायक घटना! विमानाच्या पंखात अडकला पतंगाचा मांजा, थोडक्यात दुर्घटना टळली

Famous Influencer Death : प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचं निधन; ३२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, नेमकं कारण काय?

Vande Bharat Express : देशात १८६ वंदे भारत एक्सप्रेस धावतात, महाराष्ट्रात संख्या किती? वाचा

SCROLL FOR NEXT