VIDEO: जिथे संकट असतं तिथे पंतप्रधान जात नाहीत Saam TV
Video

VIDEO: जिथे संकट असतं तिथे पंतप्रधान जात नाहीत, Sanjay Raut यांचा मोठा आरोप

Sanjay Raut News: जिकडे उत्सव आणि आनंद तिकडे पंतप्रधान जातात, संकटाच्या ठिकाणी जात नाहीत, परंतु त्यांना मणिपूर, हाथरस या ठिकाणी जायला वेळ नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली. यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. पंतप्रधान भारतीय क्रिकेट टीमला मिळू शकतात, जिकडे उत्सव आणि आनंद असतो तिकडे पंतप्रधान नेहमी जातात. जसं काही ट्रॉफी पंतप्रधानांनीच जिंकली आहे अशाप्रकारचं त्यांचं वागणं आहे. पण जिकडे संकट आहे तिथे पंतप्रधान जात नाहीत असा मोठा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मणिपूर, हाथरस येथे लोक संकटात आहेत परंतु तिकडे पंतप्रधान कधी जात नाही. का जात नाही? माहित नाही असं म्हणत संजय राऊत यांनी मोदींवर टीका केली आहे. भारतीय क्रिकेट टीमला भेटायला पंतप्रधान यांना वेळ आहे आणि भेटलंच पाहिजे, पण ज्या राज्यातून तुम्ही लोकसभेत निवडून आला आहात त्या राज्यात या देशातील सर्वात मोठी त्रासदी झाली आहे तिकडे तुम्ही जाऊ शकत नाही. असं म्हणत संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: प्रसिद्ध इन्फ्लुएंसर अडकली होती वेश्याव्यवसायात; ६ वर्षानंतर अशी झाली सुटका; भयंकर अनुभव सांगताना म्हणाली...

Chhangur Baba : यूपीतील धर्मांतर करणाऱ्या छांगुर बाबाचे पुणे कनेक्शन; कोट्यवधींची मालमत्ता खरेदी करण्याची होती तयारी

Sawan 2025 Upay: उत्तरेतील श्रावणाचा आज पहिला दिवस; 'हे' उपाय करा भगवान शंकर होतील प्रसन्न

Maharashtra Live News Update : पंढरपूर पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन

Rose : जाणून घ्या गुलाबाचे फूल खाण्याचे ५ फायदे

SCROLL FOR NEXT