पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना आदरांजली अर्पण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे मुंबईतील हुतात्मा स्मारक येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर कठोर शब्दांत टीका केली आणि दहशतवादाविरोधात ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या जागी मी असतो तर पुतिन यांची नीती वापरली असती. युक्रेन जर नोटाकडे गेला तर रशियाला धोका असल्याची मानसिकता त्यांची आहे. त्यामुळे त्यांनी युक्रेनच इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त केल आहे. त्यांचा हेतु आहे की वाद थांबेल पण युद्ध थांबल्यानंतर युक्रेन पुन्हा नोटाकडे गेला तर धोका कायम आहे. आपल्याला पण अशीच नीती वापरली पाहिजे की पाकिस्तान पुढच्या 30 वर्षात मागे जाईल, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.