दिल्ली येथील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोट प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची अकोल्यातून मोठी प्रतिक्रिया समोर आलीये. आंबेडकरांनी थेट सरकारच्या सुरक्षा यंत्रणेवर ताशेरे ओढलेये. ते अकोला येथे बोलत होते. या स्फोटामागे बाह्यशक्ती किंवा अंतर्गत शक्तीचा हात आहे का? याचा सखोल तपास झाला पाहिजे. सर्व गोष्टी पूर्णपणे उघड झाल्या पाहिजे, अशी मागणी आंबेडकरांनी केलीय. दरम्यान, देशात ठिक-ठिकाणी झालेल्या स्फोटाचा उल्लेख करत आंबेडकरांनी संघाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बिहार निवडणुकीतील मतदानाच्यावेळी स्फोट झाल्याने टाईमिंगसंदर्भात संशय व्यक्त होत असल्यावरही त्यांनी चिंता व्यक्त केलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.