अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसने भाजपसोबत युती केली होती. या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या १२ उमेदवारांनी परस्पर भाजपसोबत युती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयानंतर काँग्रेस पक्षाकडून पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी १२ नगरसेवकांचे निलंबन केले. या कारवाईनंतर सर्व नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आता अंबरनाथमधील काँग्रेसचे १२ नगरसेवक अज्ञात स्थळी गेले असल्याची माहिती समोर आली आहे. अंबरनाथ शहराध्यक्ष प्रदीप पाटील भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संपर्कात आहेत. दगा फटका होऊ नये म्हणून काँग्रेस नगरसेवक अज्ञातस्थळी गेले आहेत.
अंबरनाथ नगरपरिषद निवडणूक निकालानंतर भाजप, काँग्रेस आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने मिळवून अंबरनाथ विकास आघाडीची स्थापना केली होती. काँग्रेसमुक्त भारतच्या घोषणा देणाऱ्या भाजपसोबत काँग्रेसने अंबरनाथमध्ये हातमिळवणी केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या प्रकरणी काँग्रेस पक्षाकडून नगरसेवकांविरोधात मोठी कारवाई करत त्यांना निलंबित केले. आता हे नगरसेवक भाजपमध्ये जाणार आहेत त्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.