भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी पाकिस्तान पोसत असलेल्या दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांना धर्म विचारून त्यांची हत्या केली. यानंतर संपूर्ण देशाचे रक्त हे खवळून निघाले होते. मात्र काही दिवसातच भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर राबवत शंभर दहशतवाद्यांचा खात्मा केला.
यानंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. मोदी म्हणाले, पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना जमिनीत गाडण्यासाठी पूर्ण सूट दिली आहे. सर्व निर्णय त्यांच्या हातात आहे. आज प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या संघटनेला समजले असेल की भारतीय स्त्रीच्या कपाळावरचे कुंकू पुसल्यावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो. असे बोलत त्यांनी प्रत्येक भारतीयाला विश्वास दिला.
पुढे मोदी म्हणाले, ऑपरेशन सिंदूर हे नाव नसून देशातील प्रत्येक नगरिकाचे भावनिक प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर हे न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे.आणि सहा मे च्या रात्री जे झाले ती प्रतिज्ञा संपूर्ण देशाने बघितली, असे बोलत त्यांनी पाकिस्तानला गंभीर इशारा दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.