पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी जाहीर सभेत पाकिस्तानला इशारा दिला होता. तसेच ज्यांनी कोणी हा हल्ला केला आहे त्या लोकांना शोधून शोधून मारणार असल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी ही कडक इशारा दिल्यानंतर पाकिस्तानच्या अनेक लष्करी सैनिकांनी तर भीतीने राजीनामा देत देश सोडला.
आता यानंतर पाकिस्तानी नागरिकांमध्ये ही मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे. भारत हा कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो यामुळे पाकिस्तानच्या ATM आणि राशन दुकानाबाहेर मोठ्या रांगा लागल्याचे पहायला मिळत आहे.
22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी तीनही सैन्यदल हे सज्ज झाले आहे. याच पार्श्वभूमीवर भारत कधीही हल्ला करू शकतो या भीतीने पाकिस्तानी लोकांच्या झोपा उडाल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.