सरकारने दिलेल्या रक्कमेतून कुटुंबियांनी मदत होईल. पण गेलेला माणूस पुन्हा येत नाही. कुटुंबाचं दुःख कमी होणार नाही. प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज शरद पवार यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली. यावेळी कुटुंबांना धीर देऊ, त्यांना आधार देऊ असं सांगत कुटुंबाची आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतोय, असंही यावेळी शरद पवार यांनी जाहीर केलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्य आणि केंद्र सरकार या प्रकरणात जोपर्यंत खोलवर जाणार नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. ही सिस्टम दुरूस्त कशी होईल याची काळजी आपण घेतली पाहिजे. आरोपीचे संवाद कुणाबरोबर झाले, त्याची माहिती काढली पाहिजे, सखोल चौकशी झाली पाहिजे. अन्याय झाला, त्यावर चौकशी झाली पाहिजे. तातडीनं आरोपीला धडा शिकवला पाहिजे, असंही शरद पवार म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.