नांदेड हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची घटना आज घडली होती. या भीषण अपघातात 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हा सुन्न झाला. या अपघातानंतर काही महिलांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला. यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, नांदेडच्या आसेगावमध्ये जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. ज्या लोकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे त्यांच्या परिवाराला 5 लाखांची मदत फडणवीस यांनी जाहीर केली आणि असे अपघात पुन्हा होणार नाही या दृष्टीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहे असे फडणवीस म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.