मध्य रेल्वेवर मुंब्रा स्थानकाजवळ काल, सोमवारी झालेल्या दुर्घटनेत ४ जणांचा बळी गेला आहे. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या विरोधात प्रवाशांमध्ये प्रचंड संताप आहे. या घटनेनंतर राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलण्याचा विचार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. तसेच कोणतीही भाडेवाढ न करता सर्व लोकल एसी करण्याचा प्रयत्न करणार आहे. सार्वजनिक वाहतुकीची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी दिलं.
काय म्हणाले फडणवीस?
शासकीय कार्यालयांच्या वेळा काही प्रमाणात बदलल्या आहेत. मागच्या काळातच तो निर्णय घेतला आहे. खासगी आस्थापनांमध्ये तसं करणं थोडं कठीण जात आहे. त्यांचा फायदा आणि इतर गोष्टींचा ते विचार करतात. यात अजून काही करता येईल का हा निश्चितपणे प्रयत्न असेल. सार्वजनिक वाहतुकीचं इन्फ्रास्ट्रक्चर अजून किती वाढवता येईल, याचाही विचार आम्ही करत आहोत, असेही फडणवीस म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.