मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसला आहे. मुंबईत पडणाऱ्या सततच्या पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रात्रभर मुंबईसह उपनगर आणि ठाण्यामध्ये पाऊस पडत आहे. त्यामुळे आता रेल्वे रूळावर पाणी साचायला सुरूवात झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे मार्गावरील लोकलसेवा उशिराने सुरू आहे. बदलापूर, कर्जतकडून मुंबईकडे येणाऱ्या लोकल ट्रेन १५ ते २० मिनिटं उशिराने धावत आहेत.ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू असल्यामुळे कामाला जाणाऱ्यांचे हाल होत आहे. लोकल उशिराने धावत असल्यामुळे सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे.
अनेक लोकल उशिराने धावत असून काही लोकल रद्दही करण्यात आल्या आहेत. यामुळे रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाकडून वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे, मुंबईतील सखल भागात पाणी साचालयला सुरूवात झाली आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.