एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाचे निर्णय घेण्याचा अधिकार दिल्लीतील मोदी, शहांना दिला असेल तर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊ नये, अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. महाराष्ट्रात लागेल निकाल जनतेचा कौल नाही. 3 पक्षांना बहुमत असताना विधानसभेची मुदत संपून राज्याला सरकार मिळत नाहीय. हेच जर आमचं सरकार येणार असतं तर राष्ट्रपती राजवट लावून आम्हाला सत्तेपासून दूर ठेवलं गेलं असतं, असा टोलाही यावेळी बोलताना राऊत यांनी महायुतीला लगावला आहे. गुरुवारी सकाळी पत्रकारांशी संजय राऊत यांनी संवाद साधला.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, विरोधी पक्षासाठी कायदे नियम असतात. महायुतीला कोणताही नियम नाही. शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदावर दावा कसा असू शकतो यावर मी आता बोलणार नाही. निवडणूक आयोग, मोदी-शहांनी तुमच्या हाती दिलेल्या शिवसेनेचे निर्णय घेण्याचा अधिकार जर तुम्हाला नाही, तर तुम्ही महाराष्ट्राचा स्वाभिमान असे शब्द काढू नये, असंही त्यांनी म्हंटलं. 230 जागा जिंकलेल्या महायुतीचा अजून मुख्यमंत्री ठरत नाही. भाजपला 132 जागा म्हणजे पूर्ण बहुमत असताना राज्याचं मुख्यमंत्रीपद का लटकून पडलेलं आहे? हे जनतेला कळत नाही, लोकांना त्यात रस देखील नाही, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.