नागपूर हिंसाचारावरून शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त केला आहे. भडकाऊ भाषण देणाऱ्यांवर कारवाईची मागणी कोल्हे यांनी केली. खासदार अमोल कोल्हे म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात अशा प्रकारे भाजपच्या एखाद्या नेत्याने वक्तव्य केली असेल, तर त्याला अटक व्हायला पाहिजे. छत्रपती महाराजांविषयी अशा प्रकारे वक्तव्य करणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी. प्रशांत कोरटकर सारख्या लोकांना सरकार संरक्षण देत आहे. त्यामुळे फरार व्हायची त्यांची हिंमत होते. महिलांबाबत असं कृत्य करणाऱ्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे. भडकाऊ बोलणाऱ्यांना अद्दल घडवायला पाहिजे. नागपूरात वाद पेटवला. कोणी पेटवला ? दगड भिरकवण्याला अक्कल लागत नाही. दगड रचायला अक्कल लागते. अमेरिका अंतराळात अडकलेल्या अंतराळवीरांना आणत आहे आणि आपण काय करत आहोत'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.