नवी मुंबईतील ऐरोली परिसरात झळकलेल्या एका आगळ्या-वेगळ्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नवी मुंबई ऐरोलीसेक्टर 3 रेल्वे स्टेशनंच्या परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरवर सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट शोलेमधील डायलॉग छापण्यात आला आहे. "कितने आदमी थे, सरदार दो, और तुम तीन... फिर भी वापस लौट आये!" अशा प्रकारचा बॅनर नवी मुंबई शहरामध्ये मनसे कडून लावण्यात आलेला आहेत. हिंदी सक्तीच्या मुद्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र झाले होते. तसेच येत्या 5 जुलैला मोठ्या प्रमाणात मोर्चाचे देखील आयोजन करण्यात आले होते. मात्र या मोर्चाची धास्ती घेत सरकारने अखेर हा निर्णय रद्द केला. यावरूनच मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून नवी मुंबईत बॅनर लावण्यात आले असून महायुती सरकारवर खोचक टीकास्त्र सोडले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.