उत्तर भारतीय विकास सेनेचे प्रमुख सुनील शुक्ला यांनी काल सर्वोच न्यायालयात याचिका दाखल करत थेट मनसे पक्षाची मान्यताच रद्द करावी अशी मागणी केली आहे. यानंतर मनसैनिक चांगलेच भडकले आहे. भैय्या लोकांना मुंबईत आणि महाराष्ट्र राहू देयचे की नाही याचा आम्हाला विचार करावा लागेल असा इशारा मुंबई मनसे अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी दिला. देशपांडे म्हणाले, आमच्या पक्षाची मान्यता राहावी की नाही राहावी हे आता भैय्या ठरवणार का? आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी यासाठी जर भैय्या प्रयत्न करणार असेल तर त्यांना महाराष्ट्रात राहू देणार नसल्याचा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला. यावेळी त्यांनी भाजपवर देखील तोफ डागली आहे. भारतीय जनता पक्ष हा प्रादेशिक पक्ष संपवत आहे आणि ज्यांनी कोणी ही याचिका दाखल केली आहे ते भाजपचे पिट्ठू आहे असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.