पावसाळी वातावरणाचा आनंद घेण्यासाठी माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत आहेत. मात्र, त्यामुळे येथील रेल्वे तिकीट केंद्रावर अनियमित गर्दी निर्माण झाली असून, तिकीट घेण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांमध्ये धक्काबुक्की आणि किरकोळ वाद-विवाद होण्याच्या घटना घडत आहेत.
विशेषतः सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या वाढते. तिकीट खरेदीसाठी लावण्यात येणाऱ्या रांगा अपुऱ्या पडत असून, यामुळे शिस्तीचा अभाव निर्माण होतो. रांगेतील गोंधळामुळे काही वेळा प्रवासी एकमेकांवर ओरडत, ढकलत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी मारामारीसारखी परिस्थितीही निर्माण होत असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
स्थानिक प्रशासन आणि रेल्वे व्यवस्थापनाने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तिकीट व्यवस्थापनात सुधारणा करणे, अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक आणि योग्य नियोजनाची आवश्यकता असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.