Manoj Jarange On Devendra Fadnavis Saam Tv
Video

Manoj Jarange: फडणवीसांनी गोळ्या घातल्या तरी मी उठत नसतो, हायकोर्टाच्या सुनावणीदरम्यान जरांगे काय म्हणाले?

Manoj Jarange On Devendra Fadnavis: मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. फडणवीसांनी गोळ्या घातल्या तरी मी उठत नसतो, असं ते म्हणाले.

Priya More

'देवेंद्र फडणवीस यांनी मला गोळ्या जरी घातल्या तरी मी इथून जात नाही, असं मोठं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले. मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू असताना जरांगेंनी हे विधान केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. 'आम्ही सरकारला दोन वर्षे वेळ दिला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी मला इथे गोळ्या जरी घातल्या तरी मी इथून उठत नसतो. मागणीची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी मुंबई सोडत नाही.'

जरांगे यांनी पुढे सांगितले की, 'पोरं हुल्लडबाजी करत नाही सरकार हुल्लडबाजी करत आहे. माजमस्तीत जगणाऱ्या, माजलेल्या मुख्यमंत्र्याने जाणूनबुजून मराठ्यांचा प्रश्न सोडवला नाही. देवेंद्र फडवणीस यांनी गोळ्या जरी घातल्या तरी मी आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जात नसतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब तुमच्या एका चुकीमुळे देशाला डाग लागू शकतो. मोदी साहेबांना, शहासाहेबांना ही डाग लागेल. मला हैदराबाद गॅझेट, सातारा संस्थान, आंदोलकावरील गुन्हे माघारी, सगे सोयरे अधिसूचनेचे काय झालं ते पण पाहिजे. माझ्या पोराला कोणी हात लावायचा नाही. पोर शांत आहेत. पण देवेंद्र फडणवीस सर्व घडून आणत आहेत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GST गिफ्टसाठी दिवाळीऐवजी नवरात्रीचा मुहूर्त साधला, मोदी सरकारचा नेमका मास्टरप्लॅन काय?

Maharashtra Live News Update: मुंबई शहर व उपनगरासाठी ईद ए मिलादच्या शासकीय सुट्टीत बदल

Raigad Crime : माणगावमध्ये सशस्त्र दरोडा; २० ग्राम सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेची हत्या

'ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही' १२ मागण्या मान्य, मंत्र्याची ग्वाही; तायवाडेंनी पाणी पिऊन उपोषण सोडलं

तब्बल २ कोटी मोबाइल नंबर अचनाक बंद, सरकारने का घेतला निर्णय, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT