Manoj Jarange Patil  Saam TV Marathi news
Video

शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूनंतर जरांगेंही आक्रमक, सरकारला दिला कडक इशारा, म्हणाले...

Manoj Jarange Patil : शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी दोन नोव्हेंबरची अंतरवाली सराटी येथील बैठक रद्द केली आहे. शेतकरी एकजूट राखण्यासाठी आणि सरकारला इशारा देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

Namdeo Kumbhar

Manoj Jarange latest statement on farmers protest : 2 नोव्हेंबरची शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात होणारी अंतरवाली सराटी येथील बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर शेतकरी नेत्यांसोबत बैठक होणार होती. सध्या राज्यामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. नागपूरमध्ये एकजूट दिसली पाहिजे, दोन जागेवर नको, त्यामुळे असं वाटतं की दोन तारखेची बैठक पुढे ढकलू. शेतकऱ्यांचा आंदोलन सुरू असताना परत बैठक घेणं माझ्या बुद्धीला पटत नाही. शेतकरी आणि शेतकऱ्याचा एक जीव दिसला पाहिजे, म्हणून सध्या तरी दोन तारखेची आयोजित बैठक रद्द करूयात, असे जरांगे म्हणाले.

या आंदोलनातून सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर आपण बैठक घेऊन कशा मागण्या मान्य करत नाही ते बघू,असा इशारा दिला. शेतकरी दोन गटात दिसू नाही, शेतकरी एक जीवाचा दिसला पाहिजे.तिकडे आंदोलन सुरू असताना इकडे बैठक घेणं शोभण्यासारखं नाही, असे जरांगे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water In Morning: सकाळी रिकामी पोटी थंड की गरम पाणी पिणं योग्य? वाचा तुमच्या शरीरासाठी काय योग्य?

Maharashtra Live News Update: जळगावात वीज कर्मचारी आज संपावर

Mahashivratri Fasting Food : महाशिवरात्रीला करा उपवासाचा खमंग बेत, 'ही' रेसिपी पाहून तोंडला सुटेल पाणी

Salman Khan : सलमान खानचा मेहुणा निशाण्यावर, आयुष शर्माला जीवे मारण्याची धमकी

Ladki Bahin Yojana: फक्त याच महिलांना मिळणार जानेवारी- फेब्रुवारीचा हप्ता; खात्यात जमा होणार ₹३०००

SCROLL FOR NEXT